Partuni Ye Ghanshyam

Dinkar Joshi

Partuni Ye Ghanshyam

श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर अक्रूर, उद्धव, अर्जुन, द्रौपदी इत्यादी त्याच्या स्मृती जागवत आहेत. त्यांच्या स्मरणातून कंसवध, स्यमंतक मणी, उग्रसेन-पवनरेखेची कथा, अश्वत्थाम्याने पांडवपुत्रांची केलेली हत्या, रुक्मिणीने त्याला केलेलं शासन, जरा पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाचा झालेला मृत्यू इत्यादी अनेक घटना उलगडत जातात. वर्तमान-भूत या दोन काळांमध्ये आंदोलणाऱ्या या घटनांना चिंतनाची जोड आहे. हे चिंतन म्हणजेच ‘परतुनि ये घनश्याम...’ ही कादंबरी. श्रीकृष्णाच्या मृत्यूमुळे भकास झालेल्या द्वारकेपासून सुरू झालेली ही कथा उद्धवाच्या परममुक्तीच्या बिंदूशी येऊन ठेपते, या दोन बिंदूंमधील हे अंतर नक्कीच अनुभवण्यासारखं.